*मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन* आपले सगळेच सण उत्सव हे निसर्ग, शेतीप्रधान जीवनपद्धती, मौसमी फळे -भाज्या यांच्याशी निगडीत आहेत. पौष महिन्यात रथसप्तमीपर्यंत होणारी आदित्य राणूबाईची पूजा, दर रविवारी केली जायची. त्याच्या कथा ऐकल्या जात असत. त्यातून मिळणारा संदेश उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.. हे कानात घुमत असते. या रविवारची,रथसप्तमी ची पूजा, रांगोळीने चंदनाच्या पाटावर सूर्य, रथ रेखाटणे अशी होत असे. यातून प्रिंट मिडिया खूप प्रगत नसताना भौगोलिक ज्ञान,जीवन यांची सांगड संस्कृतीच्या माध्यमातून पुढच्या पिढ्यांकडे गेली. बिब्याची फुले, करडईचे फुले यांना महत्व असायचे. बिब्याची फुले वातहारक आहेत. प्रत्येक देवतांच्या आवडत्या फुलांमध्ये काही वैशिष्ट्ये दडली आहेत. पिवळे, तपकिरी असे हे करडई फूल सूर्याच्या तेजस्वी पणाचे द्योतक आहे. भोगविडे,संक्रांत, कर आणि महिनाभर चालणारे हळदीकुंकू असे उत्सवी बायकांच्या गोटातले वातावरण संक्रांती निमित्ताने चालू असायचे. भोगीला सात विड्याची पाने, सात...
साहित्यातील राजकारण साहित्य हे समाजाला दिशा देणारे आहे.साहित्यिकाचा आजही समाजात आदर केला जातो.तो त्याच्या एकमेवाद्वितीय प्रतिभेमुळे.थकलेल्या मनाला ते मार्गदर्शन करते .अनेक अभ्यासू व्यक्तींमुळे आपल्याला माहीत नसलेल्या क्षेत्रातील माहिती मिळते.अध्यात्मिक साहित्य हे मन: शांती प्रदान करते.लहानपणापासून एका निष्ठेने आपण या क्षेत्राकडे पहात असतो. हे सगळे असूनही साहित्यात होत असणारे राजकारण नजरेस पडते. पूर्वी कलाकारांना ,साहित्यिकांना राजाश्रय असायचा,निधीचा प्रश्न पडायचा नाही.आता स्वतंत्रपणे साहित्यसमूह मोठे करताना ते टिकवण्यासाठी न आवडणारी मदतही स्विकारावी लागते.ते आणून देणारे ,साहित्यात रस नसणारे पण लोक जपावे लागतात.निधीसोबत त्यांना हवे ते नाव,मत,प्रवाह,पक्ष ,पूर्वजांचे नाव मोठे होते.साहित्य दुय्यम ठरण्याचा धोका यात आहे. शिवाय माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जो तो ज्ञान पसरवत आहे,यात माझे ते खरे, सगळ्यांना माझा विचार समजलेच पाहिजेत , ते बिंबवलेच पाहिजे या अट्टाहासातून स्वत:च्या तथाकथित विचारसरणीची माणसे एकत्र येतात गट-तट पडत जातात.राजकारण होते. आपण स्वत: साहित्यिक म्हणून विकसित होताना काह...
*शुक्रवार दि. १८/७/२५* *साप्ताहिक गझलगंध उपक्रम क्र. २३८* *रसग्रहण* गझलकार मधुसुदन नानिवडेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. हरकत नाही- हा रदिफच विशेष आहे.बेफिकीर,मिश्किल वृत्ती दाखविणारा आहे.जेव्हा खोलवर दु:ख होते ,तेव्हादेखील दु:ख देणाऱ्या व्यक्तीला हरकत नाही म्हणून माफ करणे हा खरा मोठेपणा,उदारपणा होय.शिवाय स्वत:ची समजूत घालत ,एक मार्ग संपला तर दुसरा शोधणे होय. भरतीहुनही तुझि ओहोटी भरास येते जगावेगळा तु़झा समिंदर हरकत नाही सामान्यत: भरती ही भरास येते ,तिचा भरभरून देण्याचा कल असतो. प्रेमाला भरते येणे,भरभरून प्रेम करणे होय.परंतु एखाद्याला टाळायचेच असेल तर माणूस हजार कारणे देतो.ती भेट होऊच नये अशी त्याची ईच्छा असते.आपला हा नकार कैक रुपातून कट्टरपणे पाळतो.हे भांडण,प्रिय व्यक्तीचे जवळ नसणे म्हणजेच ओहोटी होय. किनाऱ्यापासून दूर दूर जाणाऱ्या लाटा हा वियोगच दाखवतात. यात शेरात विरोधाभासातून भरती आणि ओहोटी यातून दूर गेलेल्या नात्याचे वर्णन केले आहे.गझलकारानेओहोटीचीच भरती आली आहे ही कोटी केली आहे.जगावेगळा 'तुझा समिंदर ' म्हणून आश्चर्य व्यक्त केले आहे. या स्थितीचे वेगळेपण सांगितले आ...
धन्यवाद.
उत्तर द्याहटवा