खरे ब्रह्मकमळ (सौस्सुरीआ ऑबव्ह ) आणि क्वीन ऑफ द नाईट क्वीन आॅफ द नाईट कुंडीमध्ये लावलेले ब्रह्मकमळाचे एक झाड घरी आ हे . दरवर्षी ब्रह्मकमळाची फुले येत असतात . अगदी सोळा - सतरा वर्षापासून . प्रत्येक वेळी तेवढेच अप्रूप वाटत असते . छोटीशी कळी आली तसे आमच्या सगळ्यांचे तिच्याकडे लक्ष असते . आणि ती अचानक टपोरी बनते . आज रात्री ब्रह्मकमळ फुलणार याचा सगळ्यांना आनंद होत असतो . आणि अगदी संध्याकाळी सात - आठ पासूनच झाडाकडे आमचे लक्ष असते . फूल हळूहळू उमलताना पाहतो आणि पूर्ण उमलले की काय आनंद ! खरोखरच खूप वेगळे फूल आहे . आकाराने मोठे, पांढरा शुभ्र रंग, तलम पाकळ्या, पांढऱ्या ताऱ्या सारखे हे फूल दिसते . ही फुले वर्षातून एकदा जुलै ते सप्टेंबर च्या दरम्यान , मध्यरात्रीच्या सुमारास पूर्णपणे उमलतात व सकाळपर्यंत कोमेजून जातात . एकाच दिवशी सगळ्यांच्या घरातील ब्रह्मकमळे फुलतात हे पण एक वैशिष्ट्यच ! फुलांचा पांढरा रंग , मादक सुगंध मध्यरात्रीचे उमलणे या
शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे पूजा-कृत्य घडते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून , नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले . देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा , काली , चंडी, भैरवी , चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. १. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडा किंवा (कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९.सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.त्यांचे वर्णन संक्षिप्त रूपात कवितेमधून पाहूया. (सर्व प्रतिमा गुगलच्या सौजन्याने) सौ. अर्चना मुरुगकर 9762863231 तळेगाव दाभाडे, पुणे. 🙏🙏
जाणता राजा आई शिवाई गर्जली जिजाईच्या वेदनेने पिंड पोसला बाळाचा अन्यायाच्या संतापाने केले पोषण धीराने गोष्टी सांगत वीरांच्या मित्र मावळे सोबती देव घडला न्यायाचा तळपली तलवार केले मुलूख काबिज केली किल्ल्यांची बांधणी जिंके शत्रू कावेबाज वीर योद्धा रणावर होते सोबती जीवाचे केले स्थापन स्वराज्य स्थापी आदर्श युगांचे छत्रपती शिवा होता खरा रयतेचा राजा दिले स्त्रियांना अभय खऱ्या गुन्ह्याला सजा रात्रंदिन एक केले अंगी तेज भवानीचे राज्य एका संन्याशाचे जगी जाणत्या राजाचे अर्चना मुरूगकर🌹
धन्यवाद.
उत्तर द्याहटवा