*मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन* आपले सगळेच सण उत्सव हे निसर्ग, शेतीप्रधान जीवनपद्धती, मौसमी फळे -भाज्या यांच्याशी निगडीत आहेत. पौष महिन्यात रथसप्तमीपर्यंत होणारी आदित्य राणूबाईची पूजा, दर रविवारी केली जायची. त्याच्या कथा ऐकल्या जात असत. त्यातून मिळणारा संदेश उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.. हे कानात घुमत असते. या रविवारची,रथसप्तमी ची पूजा, रांगोळीने चंदनाच्या पाटावर सूर्य, रथ रेखाटणे अशी होत असे. यातून प्रिंट मिडिया खूप प्रगत नसताना भौगोलिक ज्ञान,जीवन यांची सांगड संस्कृतीच्या माध्यमातून पुढच्या पिढ्यांकडे गेली. बिब्याची फुले, करडईचे फुले यांना महत्व असायचे. बिब्याची फुले वातहारक आहेत. प्रत्येक देवतांच्या आवडत्या फुलांमध्ये काही वैशिष्ट्ये दडली आहेत. पिवळे, तपकिरी असे हे करडई फूल सूर्याच्या तेजस्वी पणाचे द्योतक आहे. भोगविडे,संक्रांत, कर आणि महिनाभर चालणारे हळदीकुंकू असे उत्सवी बायकांच्या गोटातले वातावरण संक्रांती निमित्ताने चालू असायचे. भोगीला सात विड्याची पाने, सात...
'मावळ सौंदर्य आणि सोनकुसूम पुष्पौत्सव' : नोकरीच्या निमित्ताने मावळात रहायला आलो ,आता मात्र अगदी मावळाच्या आम् ही प्रेमातच पडलो. इथे उन्हाळ्यात अतिशय थंडगार हवा असते. पावसाळ्यात तर दृष्टीचे पारणे फेडणारे निसर्ग सौंदर्य सर्वत्र दिसून येते. हिरवेगार गवतांचे गालीचे, डोंगरावर उतरलेले ढग,सतत पडणारा पाऊस,खळाळणारे झरे ,धबधबे मावळात असतात.दरी, डोंगर,नाले सगळे काही पावसाने कंच भिजलेले.छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान ज्यांच्या उरात भरलेला आहे असे सर्व आधुनिक मावळे गड-किल्ले सर करत असतात, दऱ्या-खोऱ्यांमधून फिरत असतात. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लोणावळा-खंडाळा, भाजे लेणी, लोहगड, खांडी धबधबा, कोंडेश्वर याठिकाणी पुण्या-मुंबईच्या पर्यटकांची अगदी गर्दीच असते. रस्ते वाहनांनी फुललेले असतात. हिवाळ्यातही अतिशय प्रसन्न भासतो हा मावळ! हिरवेगार डोंगर ,पांढरा स्वच्छ प्रकाश,निळेशार विस्तीर्ण आभाळ! ...
साहित्यातील राजकारण साहित्य हे समाजाला दिशा देणारे आहे.साहित्यिकाचा आजही समाजात आदर केला जातो.तो त्याच्या एकमेवाद्वितीय प्रतिभेमुळे.थकलेल्या मनाला ते मार्गदर्शन करते .अनेक अभ्यासू व्यक्तींमुळे आपल्याला माहीत नसलेल्या क्षेत्रातील माहिती मिळते.अध्यात्मिक साहित्य हे मन: शांती प्रदान करते.लहानपणापासून एका निष्ठेने आपण या क्षेत्राकडे पहात असतो. हे सगळे असूनही साहित्यात होत असणारे राजकारण नजरेस पडते. पूर्वी कलाकारांना ,साहित्यिकांना राजाश्रय असायचा,निधीचा प्रश्न पडायचा नाही.आता स्वतंत्रपणे साहित्यसमूह मोठे करताना ते टिकवण्यासाठी न आवडणारी मदतही स्विकारावी लागते.ते आणून देणारे ,साहित्यात रस नसणारे पण लोक जपावे लागतात.निधीसोबत त्यांना हवे ते नाव,मत,प्रवाह,पक्ष ,पूर्वजांचे नाव मोठे होते.साहित्य दुय्यम ठरण्याचा धोका यात आहे. शिवाय माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जो तो ज्ञान पसरवत आहे,यात माझे ते खरे, सगळ्यांना माझा विचार समजलेच पाहिजेत , ते बिंबवलेच पाहिजे या अट्टाहासातून स्वत:च्या तथाकथित विचारसरणीची माणसे एकत्र येतात गट-तट पडत जातात.राजकारण होते. आपण स्वत: साहित्यिक म्हणून विकसित होताना काह...
धन्यवाद.
उत्तर द्याहटवा