पोस्ट्स

चिमणी

इमेज
 चिऊ चिऊ चिऊ चिमणी  उडत अंगणात येते   चिवचिव गोड गोड गोष्टी कानात सांगते  हिरव्यागार फांदीवर बसून झोके घेते  मी जवळ जाताच लगेच उडून जाते भुर्र भुर्र भुर्र भुर्र‌‌‌  उगाच उडत असते खूप उन्हात दुपारी  पानांत दडून बसते आजी ठेवते बाऊल गार निर्मळ पाण्याचा पाणी उडवत चिऊ आनंद घेते पोहण्याचा  गप्पा गोड चिऊच्या आवडतात मला फार   आवाज तिचा गोड ऐकून मन होते हिरवेगार  अर्चना मुरुगकर 

नेट फाॅरवर्डस् (लेख)

इमेज
नेटफाॅरवर्डस आणि घरातील स्वयंघोषित तज्ञ खरंतर आता हे मेसेजेस खूप सवयीचे झाले आहेत.स्मरणशक्ती शाबूत असणा-यांना ते पाहिल्याबरोबर आठवतात. नेटवर तर ज्याला ज्याच्यात रस त्याचे अल्गोरिदम बनते,तेच ते पाहणे आणि तज्ञ बनणे ही फुकटची सोय उपलब्ध झाली आहे.    नृत्य,जेवण,खरेदी,आरोग्य,सिनेमा,गेम्स,पाॅर्न,फॅशन्स,शेअरमार्केट,इतकंच कशाला चालू राजकीय घडामोडीतील एखाद्या गोष्टींचे रील्स याला काही मर्यादा नाही ,एवढा मोठा डेटा उपलब्ध होत असतो. 'मी नाही त्यातला' असे म्हणत सावकाश लहानमोठा प्रत्येकजण सोशल मिडिया,आॅनलाईन खरेदी यात गुंतलेला आहेच.जे प्रकर्षाने टाळतात किंवा वयामुळे जमत नाही त्यांना 'फोमो' असतोच.कारण कुणीही याचा संदर्भ देतो,तेव्हा मागासलेपण वाटते.    सल्ले देण्याचा अबाधित हक्क असणाऱ्या वृद्धांनाच आता सल्ले ऐकण्याची वेळ आली आहे.  मध्ये एक उदाहरण पाहिले की एका सासूबाईंनी गौरीच्या वेळी सुनेला हातचे राखून मार्गदर्शन केले,आता ही ताट कशी वाढणार परीक्षा पाहत होत्या,पण तिने छान केले सगळे, नेटवरून पाहिले होते.असा फायदा पण होतो.त्यातल्या त्यात आरोग्य आणि खाद्यपदार्थ हे जवळचे विषय.काही...

साहित्यातील राजकारण

इमेज
 साहित्यातील राजकारण साहित्य हे समाजाला दिशा देणारे आहे.साहित्यिकाचा आजही समाजात आदर केला जातो.तो त्याच्या एकमेवाद्वितीय प्रतिभेमुळे.थकलेल्या मनाला ते मार्गदर्शन करते .अनेक अभ्यासू व्यक्तींमुळे आपल्याला माहीत नसलेल्या क्षेत्रातील माहिती मिळते.अध्यात्मिक साहित्य हे मन: शांती प्रदान करते.लहानपणापासून एका निष्ठेने आपण या क्षेत्राकडे पहात असतो. हे सगळे असूनही साहित्यात होत असणारे राजकारण नजरेस पडते. पूर्वी कलाकारांना ,साहित्यिकांना राजाश्रय असायचा,निधीचा प्रश्न पडायचा नाही.आता स्वतंत्रपणे साहित्यसमूह मोठे करताना ते टिकवण्यासाठी न आवडणारी मदतही स्विकारावी लागते.ते आणून देणारे ,साहित्यात रस नसणारे पण लोक जपावे लागतात.निधीसोबत त्यांना हवे ते नाव,मत,प्रवाह,पक्ष ,पूर्वजांचे नाव मोठे होते.साहित्य दुय्यम ठरण्याचा धोका यात आहे. शिवाय माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जो तो ज्ञान पसरवत आहे,यात माझे ते खरे, सगळ्यांना माझा विचार समजलेच पाहिजेत , ते बिंबवलेच पाहिजे या अट्टाहासातून स्वत:च्या तथाकथित विचारसरणीची माणसे एकत्र येतात गट-तट पडत जातात.राजकारण होते. आपण स्वत: साहित्यिक म्हणून विकसित होताना काह...

हरकत नाही

इमेज
 *शुक्रवार दि. १८/७/२५* *साप्ताहिक गझलगंध उपक्रम क्र. २३८* *रसग्रहण* गझलकार मधुसुदन नानिवडेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. हरकत नाही- हा रदिफच विशेष आहे.बेफिकीर,मिश्किल वृत्ती दाखविणारा आहे.जेव्हा खोलवर दु:ख होते ,तेव्हादेखील दु:ख देणाऱ्या व्यक्तीला  हरकत नाही म्हणून माफ करणे हा खरा मोठेपणा,उदारपणा होय.शिवाय स्वत:ची समजूत घालत ,एक मार्ग संपला तर दुसरा शोधणे होय. भरतीहुनही तुझि ओहोटी भरास येते जगावेगळा तु़झा समिंदर हरकत नाही सामान्यत: भरती ही भरास येते ,तिचा भरभरून देण्याचा  कल असतो. प्रेमाला भरते येणे,भरभरून प्रेम करणे होय.परंतु एखाद्याला टाळायचेच असेल तर माणूस हजार कारणे देतो.ती भेट होऊच नये अशी त्याची ईच्छा असते.आपला हा नकार कैक रुपातून कट्टरपणे पाळतो.हे भांडण,प्रिय व्यक्तीचे जवळ नसणे म्हणजेच ओहोटी होय. किनाऱ्यापासून दूर दूर जाणाऱ्या लाटा हा वियोगच दाखवतात. यात शेरात विरोधाभासातून भरती आणि ओहोटी यातून दूर गेलेल्या नात्याचे वर्णन केले आहे.गझलकारानेओहोटीचीच भरती आली आहे ही कोटी केली आहे.जगावेगळा 'तुझा समिंदर ' म्हणून आश्चर्य व्यक्त केले आहे. या स्थितीचे वेगळेपण सांगितले आ...

राजस नखरा

इमेज
 राजस नखरा शांत ,शुभ्र,मोत्यासारखा टपोरा मोगरा, फुलतो तो फक्त दाहक उन्हाळ्यातच.काही ठिकाणी सरबतात वापरला जातो तर काही ठिकाणी सौंदर्य प्रसाधनात! चैत्र गौरीच्या हळदीकुंकवाची रंगत हिरव्यागार आंब्याच्या डहाळ्या,लगडलेल्या कैऱ्या,सुगंधी सरबत,हातावर दिले जाणारे अत्तर,गुलाबदाणीतील गुलाबपाणी,तिखटगोड आंबट चव व हिंगाची फोडणी असणारी आंबेडाळ,मंदगंधित कलिंगडाच्या फोडी,वाळा घातलेले माठातले थंडगार पाणी यासोबतच  गौरीच्या झोपाळ्यावर ,अंबाड्यावर असणारी मोगऱ्याची वेणी खास बहार आणते. सुवास आणि गारवा निर्माण करते.सुवासिणींना दिले जाणारे मागऱ्याचे गजरे ही तर मोलाची भेट वाटते. वसंत ऋतूमधला हा काळ सुगंधित करून जातो. चैत्र महिन्याचं स्वागत हा मोगरा करतो आणि तळपत्या उन्हात मिरवत राहतो. स्वतःचं शुभ्रपण जपतो. आतपर्यंत असणाऱ्या छोट्या पाकळ्या आणि पाकळीमागून वर येणाऱ्या पाकळ्या गूढता ,धुंदगंधितता वाढवतात. दोन पानांमध्ये लडिवाळपणे उमलणारा मोगरा मंदगंधाने जगाला थंडाव्याची साद देत असतो. मोगऱ्याची टपोरी फुलं उमलली की निसर्गाने अत्तराच्या कुप्या उघडल्या आहेत असेच वाटते! आपल्या प्रिय व्यक्तीने आवडीने दिलेली मो...

लावणी

इमेज
  #गोदातीर्थउपक्रम लावणी वृत्त - हरिभगिनी वाट पाहुनी जीव खंगला अधीर झाले मी राया सांगा कसला विचार करता मिठीत घ्या हो ही काया कशी थांबवू तुम्हा विना मी या थरथरत्या कायेला तुमच्या डोळ्यामध्ये दिसल्या आतुरलेल्या  मायेला गडद गुलाबी नवी पैठणी खंत लागली सांगाया उगाच बाई इतकी सजले फुकाच जाइल हो वाया सांगा कसला विचार करता मिठीत घ्या हो ही काया रुबाब तुमचा मनात ठसला तुम्हा पाहुनी गोंधळले नजर रोखुनी कशास बघता उरात माझ्या धडधडले पायामधले बघा लागले पुन्हा घुंगरू वाजाया तुम्हा करीता पुन्हा पटावर धावत आले नाचाया सांगा कसला विचार करता मिठीत घ्या हो ही काया नकाच सांगू सबब कोणती लोकांची अन गावाची नजर सांगते तुमची एकच राणी मी हो मानाची पाउल तुमचे का अडखळले इथे लागले थांबाया लाख सोडुनी तुमच्यामध्ये जीव लागला गुंताया सांगा कसला विचार करता मिठीत घ्या हो ही काया दंडामध्ये चोळी रुतली कथा सांगते ज्वानीची नाव विसरले गाव विसरले करणी झाली पिरतीची दूर थांबता उगाच बघता कसे लागता भुलवया हुरहुरलेली चंचल हरिणी तुम्हा लागली शोधाया सांगा कसला विचार करता मिठीत घ्या हो ही काया. ©अर्चना मुरुगकर

नागपंचमी

इमेज
 नागपंचमी खरोखरच विहंगम असे श्रावणाचे चित्र!   हा सणांचा महिना! श्रावणी सोमवार, शुक्रवार यातून श्रावणाची गंमत सुरू होते.   बेल, आघाडा, केणा,दुर्वा, फुले गोळा करताना बारकाईने हिरवी सृष्टी बघायला मिळते. पूजा, मंगलमय आरती याने भारावून गेल्यासारखे वाटते.       नागपंचमी हा एक श्रावणातला सुंदर सण! या दिवशी नागाची पूजा करण्यासाठी वारुळाला म्हणजे नागोबाच्या मंदिरात बायका जातात. बांगड्या, नेलपेंट, रिबिनी,नवे कपडे याची गंमत असते.हातावर मेंदी लावली जाते. हिरवागार निसर्ग, लालबुंद रंगलेली मेंदी हा संगम आनंददायी वाटतो. एक बदल! यातून सौंदर्यदृष्टी विकसित होते. ज्वारीच्या  लाह्यांचा प्रसाद असतो. फोडणीच्या लाह्या, दही मेतकूट घातलेल्या लाह्या असे पदार्थ खायला मिळतात. ज्वारी हे कोंडायुक्त भरडधान्य त्याच्या भाजून बनवलेल्या लाह्या पचायला हलक्या असतात.   पंचमीदिवशी उकडीचे पदार्थ करतात. मुटके भात, पुरणाचे दिंड,ओल्या शेवयांची खीर हे या ऋतूमानात पचणारे ,हलके असे अन्न! वडिलांचे,भावांचे डोळे धुवून औक्षण केले जाते. डोळ्यांचे आरोग्य जपणे महत्वाचे आहे....