पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रदूषण

 *प्रदूषण टाळा अन्यथा विनाश अटळ* नमस्कार..  पर्यावरण म्हणजे जिवाच्या आजूबाजूचा परिसर! याचा जिवावर परिणाम होतो तसाच जिवाचाही पर्यावरणावर परिणाम होतो. अरण्यात राहणारा माणूस ते आजचा माणूस यात खूप फरक झाला आहे. तसाच पर्यावरणातही फरक झाला.  निसर्गाशी संलग्न असे जीवन जगणारा माणूस ते निसर्गाचा फक्त उपभोग घेणारा माणूस असा बदल प्रकर्षाने जाणवत आहे.  तापमान बदल, मातीची झीज, ग्रीन हाऊस इफेक्ट, हवा प्रदूषण, पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण, रासायनिक खतांचा वापर, हायब्रीड बियाणे, बायोटेक्नॉलॉजीचा फायद्यासाठी वापर ही सगळी पर्यावरण -हासाची उदाहरणे.  याचे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. निसर्गातील संपूर्ण सजीव, निर्जीव घटकांवर याचा परिणाम होत आहे.आपली निसर्गपुजकाची संस्कृती! निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कितीतरी सण आपण साजरे करतो. नदीला आई म्हणतो. देवी म्हणून पूजा करतो. पण हळूहळू ही प्रथा शिल्लक राहिली आणि त्यामागची पर्यावरण रक्षणाची भावना कमी झाली.  आजच्या आपल्या राष्ट्रपती मा. द्रौपदी मूर्मू यांनी आदिवासी समाजाची ओळख करून देताना 'आम्ही निसर्गात राहणारे आणि निसर्गाचे रक्षण ही करणार

स्त्री आणि स्वयंपाकघर

 *रविवार लेख उपक्रम* दि.२/४/२०२३ *अजूनही स्वयंपाक या प्रकारात स्त्रियांची मक्तेदारी आहे का?*       खरे तर हा प्रश्नच अवास्तव आहे. आज  स्त्रिया माझी ही मक्तेदारी आहे, कुणीही हस्तक्षेप करू नका असे सांगतच नाहिएत! ही फक्त स्त्रियांची जबाबदारी आहे का? हा प्रश्न योग्य वाटतो.असे अनेकांना वाटते. ज्यांच्या अंगवळणी घर पडले आहे त्या आई, आजी, सासू, नणंद, जाऊ इत्यादी सर्वांना.सून सोडून.  पुरुषांनाही ही जबाबदारी फक्त स्त्रियांची आहे असे वाटू शकते, जेव्हा आयते हातात घेण्याची सवय लागलेली, लावलेली असते.  खरे तर मुलांचे संगोपन, घरात सुरक्षित रहाणे यासोबतच हे आलेअसावे. युद्ध, शेतीतली कठीण कामे किंवा अध्ययन यापासून स्त्रिया दूर होत्या, नजीकच्या भूतकाळात.  खरे तर स्वयंपाक हे पण शास्त्रच आहे. तो पण आपल्या माणसांसाठी प्रेमाने रांधावा लागतो. त्यात येणारे अनेक बारकावे, घरातल्यांच्या आवडीनिवडी जपाव्या लागतात. यासाठी निवांत वेळ, सराव, कौशल्ये, सहजता असे टप्पे येत जातात.  राहिला प्रश्न स्त्री - पुरुष आणि स्वयंपाक असा!  आता मुलींचे जीवन मुलांइतकेच नोकरीसाठी, कामधंद्यासाठी स्पर्धात्मक बनले आहे. तीची जडणघडण फक्त उद्

गझलची ओळख आणि सुरेश भट

 गझल काय आहे हे माहीत नव्हते. पण  एकदा १७-१८ वर्षाची असताना वाचनाच्या सवयीमुळे मिर्झा गालिब यांचे चरित्र असणारे पुस्तक वाचण्यात आले होते.  या सुरेश भटांच्याच रचना आहेत, हे माहीत नसताना आशाजींनी गायलेली त्यांची अनेक गाणी खूप आवडायची. एकूणच पद्य लेखन करताना गझलेची फार लवकर ओळख झाली. गझल लेखन वाचन दोहोंचाही आनंद खूप वाटतो. मा. सुरेश भटांच्या गझलांची  गोडी अवीट आहे. ते या क्षेत्रातील अढळ स्थान आहे.  त्यांच्या जीवनावर आधारित पूर्वी केलेली एक रचना पुढे देत आहे.काही कमतरता असू शकतात. पण आदरभाव खरा आहे.  आपण या गझलपंढरीचे एक वारकरी, एक कण म्हणून भाग्यशाली आहोत ही भावनाही त्यांच्या प्रती जवळचे नाते दृढ करत असते.  या निमित्ताने मा. विजय जोशी सरांचे ही ऋण व्यक्त करते. 'जे जे ठावे आपणासी.. ' या उक्तीप्रमाणे ते गझल कार्यशाळा घेत असतात , मार्गदर्शन करतात आणि शिष्यही घडवतात.  एका विशाल सागराला काही ओळींमध्ये मांडण्याचा हा अल्पमती प्रयत्न. धन्यवाद!  मन दु:खात रंगले बहुधा सुख त्यालाच मानले बहुधा नशिबाशीच रोजचे लढणे क्षण शब्दात सांडले बहुधा जगण्यानेच मानता परके कवितेनेच जाणले बहुधा छळणारेच भोवती