साहित्यातील राजकारण

साहित्यातील राजकारण साहित्य हे समाजाला दिशा देणारे आहे.साहित्यिकाचा आजही समाजात आदर केला जातो.तो त्याच्या एकमेवाद्वितीय प्रतिभेमुळे.थकलेल्या मनाला ते मार्गदर्शन करते .अनेक अभ्यासू व्यक्तींमुळे आपल्याला माहीत नसलेल्या क्षेत्रातील माहिती मिळते.अध्यात्मिक साहित्य हे मन: शांती प्रदान करते.लहानपणापासून एका निष्ठेने आपण या क्षेत्राकडे पहात असतो. हे सगळे असूनही साहित्यात होत असणारे राजकारण नजरेस पडते. पूर्वी कलाकारांना ,साहित्यिकांना राजाश्रय असायचा,निधीचा प्रश्न पडायचा नाही.आता स्वतंत्रपणे साहित्यसमूह मोठे करताना ते टिकवण्यासाठी न आवडणारी मदतही स्विकारावी लागते.ते आणून देणारे ,साहित्यात रस नसणारे पण लोक जपावे लागतात.निधीसोबत त्यांना हवे ते नाव,मत,प्रवाह,पक्ष ,पूर्वजांचे नाव मोठे होते.साहित्य दुय्यम ठरण्याचा धोका यात आहे. शिवाय माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जो तो ज्ञान पसरवत आहे,यात माझे ते खरे, सगळ्यांना माझा विचार समजलेच पाहिजेत , ते बिंबवलेच पाहिजे या अट्टाहासातून स्वत:च्या तथाकथित विचारसरणीची माणसे एकत्र येतात गट-तट पडत जातात.राजकारण होते. आपण स्वत: साहित्यिक म्हणून विकसित होताना काह...