उपवास म्हणजे नेमकं काय ???
'उप-वास 'म्हणजे मन व शरीर शुद्धीचा यज्ञ आहे.
'उप 'म्हणजे जवळ, आणि 'वास' म्हणजे वास्तव्य. याचा अर्थ देवासाठी केलेले उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ राहणे.
भारतीय आणि उपवास यांचे नाते आपण चांगलेच जाणून आहोत ,त्यातही इतर गोष्टींप्रमाणेच महाराष्ट्र यातही आघाडीवर आहे.
लंघना ने सुद्धा वाढलेल्या दोषांचे पाचन होऊन स्रोतोरोध कमी होतो . शरीराला हलकेपणा जाणवतो , भूक चांगली लागते , प्रसन्नता , उत्साह व रोग प्रतिकारशक्ती वाढते.
उपवासामुळे शरीराच्या चयापचय संस्थेवर सतत पडणारा ताण कमी होतो.
गरम पाणी
उपवासाला साबुदाणा, रताळी, बटाटे,शेंगदाणे असे पदार्थ न खाता ,गरम पाणी प्यावे आम कमी करण्यासाठी छान काम करते.
ताक
राजगिरा
गरम दूध
उपवास सोडताना हळू हळू आहार वाढवावा काही जण उपवास सोडण्याच्या च्या दिवशी भरपूर खातात असे करू नये . उपवास म्हणजे काम क्रोध आदी दुर्गुणांचा परित्याग व सत्य अहिंसा सात्विक गुणांचे उपादान करणे होय .
आपण सतत काही ना काहीतर चुकीचे अन्नपदार्थ पोटात घालवत राहतो. त्याचा परिणाम शरीरावर होऊन अनेक आजार निर्माण होतात. पण हे थांवबण्यासाठी आणि शरीराचं पचन आणि शरीराचं तंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण उपवास करायला हवा. त्यामुळे तुमचं वय वाढतं. योग्य तऱ्हेने उपवास केल्यास, तुमचं वय निश्चितच वाढतं. कारण उपवासाच्या वेळी आपण शरीराला आवश्यक तितकाच आहार घेतो. अरबट चरबट खात नाही. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.
ज्यांची साखर अनियंत्रित राहते त्यांनी उपवास करू नये. जे आहार आणि व्यायाम यांचे संतुलन व्यवस्थित ठेवतात, अशा मधुमेहाच्या रुग्णांना उपवासाशी संबंधीत धोके कमी असतात. त्यामुळे असे व्यक्ती उपवास करू शकतात.
जे औषधीद्वारे साखर नियंत्रणात ठेवतात ते देखील नवरात्रीचे उपवास ठेऊ शकतात. मधुमेहाच्या रुग्णांना उच्च रक्तदाब तसेच जुलाबाचा धोका असतो, त्यामुळे त्यांनी उपवासात नारळ पाणी, निंबू पाणी, लस्सी घेतली पाहिजे.
नवरात्रात अनेकजण मीठ वर्ज्य करतात. आठ-नऊ दिवस मीठाशिवाय राहिल्यास थकवा जाणवतो आणि रक्तदाब कमी होतो. त्यामुळे याकाळात सेंधव मीठ सेवन करता येईल.
एकूणच शरीराची शुद्धी करून त्यामध्ये साठलेले सर्व हानिकारक घटक बाहेर पडावेत, तसेच पचनतंत्र सुरळीत चालावे यासाठी उपवास लाभकारी आहे.
सौ. अर्चना मुरूगकर.
छान माहिती आहे
उत्तर द्याहटवा