पोस्ट्स

पर्यटन

इमेज
  पर्यटन- भ्रमंतीचे  महत्व पर्यटन ही एक अनुभूती आहे. नेहमीच्या त्याच त्या कामातून माणूस बाहेर पडतो. त्याला हा बदल सुखावणाराच असतो.थंडगार मोकळी हवा, निसर्गाचे सन्निध्य आणि कुठलेच वेळेचे बंधन नसणे यासारखे सुख नाही. रोम रोम आनंदाने पुलकित होतो. यातून भिन्न संस्कृती समजते. वेगवेगळ्या ठिकाणचे आहार विहार, आचार, पोषाख यांची माहिती मिळते. खाद्यपदार्थांवरही ताव मारता येतो. बरं आजच्या काळात सारे कुटुंब एकमेकांना पूर्ण वेळ देऊ शकते. अनेक सफरी संस्मरणीयही ठरतात.   पर्यटनामुळे अनेक ऐतिहासिक ठिकाणे प्रत्यक्ष पहाता येतात, भौगोलिक वैविध्य समजते, जैविक वैविध्य, वेगळी झाडे, माती, डोंगर, कधी बर्फ तर कधी समुद्र अनुभवता येतो. अनुभवणे हे व्ययक्तिक पातळीवरचे असते.माणसाला ताणतणावांचा विसर पडतो. पुन्हा कार्य करण्याची उर्मी मिळते. संघामुळे  आनंद वाढतो.   माणसाचे आपल्या घरावर प्रेम असते. घर सुटतच नाही. या प्रवासाच्या धामधुमीत सर्व कष्टदायक जबाबदाऱ्यांतुनही आपसूकच मुक्तता होते. आपल्यामुळे जगात काही फरक पडत नाही, हे तरी कळतेच. उत्साहाने जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती वाढते. तीच ती रूढी ब...

लेख मकरसंक्रांत

  *मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन*      आपले सगळेच सण उत्सव हे निसर्ग, शेतीप्रधान जीवनपद्धती, मौसमी फळे -भाज्या यांच्याशी निगडीत आहेत. पौष महिन्यात रथसप्तमीपर्यंत  होणारी आदित्य राणूबाईची पूजा, दर रविवारी केली जायची. त्याच्या कथा ऐकल्या जात असत.  त्यातून मिळणारा संदेश उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.. हे कानात घुमत असते. या रविवारची,रथसप्तमी ची पूजा, रांगोळीने चंदनाच्या पाटावर सूर्य, रथ रेखाटणे अशी होत असे. यातून प्रिंट मिडिया खूप प्रगत नसताना भौगोलिक ज्ञान,जीवन यांची सांगड  संस्कृतीच्या माध्यमातून  पुढच्या पिढ्यांकडे गेली.  बिब्याची फुले, करडईचे फुले यांना महत्व असायचे. बिब्याची फुले वातहारक आहेत. प्रत्येक देवतांच्या आवडत्या फुलांमध्ये काही वैशिष्ट्ये दडली आहेत. पिवळे, तपकिरी असे हे करडई फूल सूर्याच्या तेजस्वी पणाचे द्योतक आहे.  भोगविडे,संक्रांत, कर आणि महिनाभर चालणारे हळदीकुंकू असे उत्सवी बायकांच्या गोटातले वातावरण  संक्रांती निमित्ताने चालू असायचे. भोगीला सात विड्याची पाने, सात...

श्रावण

 श्रावण श्रावण म्हणजे सळसळणारी हिरवी पाने ओली गं झोपाळ्यावर झुलता झुलता मने सयांची  भिजती गं खरोखरच विहंगम असे श्रावणाचे चित्र! आताच्या धावपळीत केलेली एखादी वर्षासहल निसर्गाच्या बरेच जवळ घेऊन जाते.  पण कुठे तरी अपुर्णता  जाणवते. बालपणीचा श्रावण डोळ्यासमोर तरळत असतो. खेळता- खेळता,शाळेतून येतानाचे मुक्त भिजणे आठवते!  हा सणांचा महिना! श्रावणी सोमवार, शुक्रवार यातून श्रावणाची जाणीव व्हायची.   श्रावणी सोमवारची अर्धी सुट्टी, बेलाचे ढीग, पांढरी फुले, मंदिराजवळची गाणी, सगळे शिवमय होऊन जायचे.  श्रावणी शुक्रवारसाठी आघाडा, केणा,दुर्वा, फुले गोळा करताना बारकाईने हिरवी सृष्टी बघायला मिळायची. जिवतीची पूजा, पुरणाचा नैवेद्य, लक्ष्मीच्या आरत्या हे सगळे मंगलमय वाटायचे. जेष्ठादेवीच्या आरतीचे पुरणाचे दिवे असायचे. तूप टाकलेल्या या दिव्यांनी मुलांना ओवाळले जायचे, नंतर करपलेला भाग काढून ते दिवे खाणे ही गम्मतच असायची. या दिवशी श्रद्धेने  कथा वाचल्या जायच्या.       नागपंचमीही अशीच छान नटलेली. नागाची पूजा, त्यासाठी  वारुळाला म्हणजे नागोबाच्या ...

बाप

 सुमंदारमाला (लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा)  बाप मुलांनी शिकावे शहाणे बनावे अशी भावना रोज त्याच्या मनी सदा राबतो बाप प्रेमामुळे या असे कष्टणे रोज दारीघरी स्वत:ला उपाशी जरी ठेवतो तो जरा देतसे आवडीचे घरी असे एक इच्छा मनाशी तयाच्या मुलाने चढावे यशाच्या शिरी जरी शिस्त वाटे नकोशी नकोशी दरारा पित्याचा पहावा घरी  सहारा तिचा बाप रागावताना मऊ सावली माय वाटे बरी उबेचा दुशाला घरी गुंतलेला असे गोकुळाची जशी सावली मुलाला मिळे आत्मविश्वास येथे उडी झोपडीची निघे अंबरी असे काय नाते मुलाचे पित्याशी असा प्रश्न वेडा मला त्रासतो घडावे कशाने जगी युद्ध मोठे बनावे महाभारताचे जसे मुलाच्या सुखाची मनी लालसा ही स्वत: त्रासतो वंचनानी जरी जगी पितृ प्रेमामुळे या कुणाचे असे होतसे कधीचे हसे खरी ओढ पेशीतुनी या जिवाची नवे नाव नात्यास तो ठेवतो स्वत:च्या रुपाला जगी पाहतो तो नवे स्वप्न त्याचेच साकारतो फुटे अंकुराला कळी पालवी जी नवा वृक्ष होण्यास जोपासतो असे कौतुकाची अनोखी अदा ही स्वत:तील बापास जोपासतो सौ.अर्चना मुरूगकर

प्रदूषण

 *प्रदूषण टाळा अन्यथा विनाश अटळ* नमस्कार..  पर्यावरण म्हणजे जिवाच्या आजूबाजूचा परिसर! याचा जिवावर परिणाम होतो तसाच जिवाचाही पर्यावरणावर परिणाम होतो. अरण्यात राहणारा माणूस ते आजचा माणूस यात खूप फरक झाला आहे. तसाच पर्यावरणातही फरक झाला.  निसर्गाशी संलग्न असे जीवन जगणारा माणूस ते निसर्गाचा फक्त उपभोग घेणारा माणूस असा बदल प्रकर्षाने जाणवत आहे.  तापमान बदल, मातीची झीज, ग्रीन हाऊस इफेक्ट, हवा प्रदूषण, पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण, रासायनिक खतांचा वापर, हायब्रीड बियाणे, बायोटेक्नॉलॉजीचा फायद्यासाठी वापर ही सगळी पर्यावरण -हासाची उदाहरणे.  याचे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. निसर्गातील संपूर्ण सजीव, निर्जीव घटकांवर याचा परिणाम होत आहे.आपली निसर्गपुजकाची संस्कृती! निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कितीतरी सण आपण साजरे करतो. नदीला आई म्हणतो. देवी म्हणून पूजा करतो. पण हळूहळू ही प्रथा शिल्लक राहिली आणि त्यामागची पर्यावरण रक्षणाची भावना कमी झाली.  आजच्या आपल्या राष्ट्रपती मा. द्रौपदी मूर्मू यांनी आदिवासी समाजाची ओळख करून देताना 'आम्ही निसर्गात राहणारे आणि...

स्त्री आणि स्वयंपाकघर

 *रविवार लेख उपक्रम* दि.२/४/२०२३ *अजूनही स्वयंपाक या प्रकारात स्त्रियांची मक्तेदारी आहे का?*       खरे तर हा प्रश्नच अवास्तव आहे. आज  स्त्रिया माझी ही मक्तेदारी आहे, कुणीही हस्तक्षेप करू नका असे सांगतच नाहिएत! ही फक्त स्त्रियांची जबाबदारी आहे का? हा प्रश्न योग्य वाटतो.असे अनेकांना वाटते. ज्यांच्या अंगवळणी घर पडले आहे त्या आई, आजी, सासू, नणंद, जाऊ इत्यादी सर्वांना.सून सोडून.  पुरुषांनाही ही जबाबदारी फक्त स्त्रियांची आहे असे वाटू शकते, जेव्हा आयते हातात घेण्याची सवय लागलेली, लावलेली असते.  खरे तर मुलांचे संगोपन, घरात सुरक्षित रहाणे यासोबतच हे आलेअसावे. युद्ध, शेतीतली कठीण कामे किंवा अध्ययन यापासून स्त्रिया दूर होत्या, नजीकच्या भूतकाळात.  खरे तर स्वयंपाक हे पण शास्त्रच आहे. तो पण आपल्या माणसांसाठी प्रेमाने रांधावा लागतो. त्यात येणारे अनेक बारकावे, घरातल्यांच्या आवडीनिवडी जपाव्या लागतात. यासाठी निवांत वेळ, सराव, कौशल्ये, सहजता असे टप्पे येत जातात.  राहिला प्रश्न स्त्री - पुरुष आणि स्वयंपाक असा!  आता मुलींचे जीवन मुलांइतकेच नोकरीसाठी, कामधंद्...

गझलची ओळख आणि सुरेश भट

 गझल काय आहे हे माहीत नव्हते. पण  एकदा १७-१८ वर्षाची असताना वाचनाच्या सवयीमुळे मिर्झा गालिब यांचे चरित्र असणारे पुस्तक वाचण्यात आले होते.  या सुरेश भटांच्याच रचना आहेत, हे माहीत नसताना आशाजींनी गायलेली त्यांची अनेक गाणी खूप आवडायची. एकूणच पद्य लेखन करताना गझलेची फार लवकर ओळख झाली. गझल लेखन वाचन दोहोंचाही आनंद खूप वाटतो. मा. सुरेश भटांच्या गझलांची  गोडी अवीट आहे. ते या क्षेत्रातील अढळ स्थान आहे.  त्यांच्या जीवनावर आधारित पूर्वी केलेली एक रचना पुढे देत आहे.काही कमतरता असू शकतात. पण आदरभाव खरा आहे.  आपण या गझलपंढरीचे एक वारकरी, एक कण म्हणून भाग्यशाली आहोत ही भावनाही त्यांच्या प्रती जवळचे नाते दृढ करत असते.  या निमित्ताने मा. विजय जोशी सरांचे ही ऋण व्यक्त करते. 'जे जे ठावे आपणासी.. ' या उक्तीप्रमाणे ते गझल कार्यशाळा घेत असतात , मार्गदर्शन करतात आणि शिष्यही घडवतात.  एका विशाल सागराला काही ओळींमध्ये मांडण्याचा हा अल्पमती प्रयत्न. धन्यवाद!  मन दु:खात रंगले बहुधा सुख त्यालाच मानले बहुधा नशिबाशीच रोजचे लढणे क्षण शब्दात सांडले बहुधा जगण्यानेच मानता परक...