पोस्ट्स

बाप

 सुमंदारमाला (लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा)  बाप मुलांनी शिकावे शहाणे बनावे अशी भावना रोज त्याच्या मनी सदा राबतो बाप प्रेमामुळे या असे कष्टणे रोज दारीघरी स्वत:ला उपाशी जरी ठेवतो तो जरा देतसे आवडीचे घरी असे एक इच्छा मनाशी तयाच्या मुलाने चढावे यशाच्या शिरी जरी शिस्त वाटे नकोशी नकोशी दरारा पित्याचा पहावा घरी  सहारा तिचा बाप रागावताना मऊ सावली माय वाटे बरी उबेचा दुशाला घरी गुंतलेला असे गोकुळाची जशी सावली मुलाला मिळे आत्मविश्वास येथे उडी झोपडीची निघे अंबरी असे काय नाते मुलाचे पित्याशी असा प्रश्न वेडा मला त्रासतो घडावे कशाने जगी युद्ध मोठे बनावे महाभारताचे जसे मुलाच्या सुखाची मनी लालसा ही स्वत: त्रासतो वंचनानी जरी जगी पितृ प्रेमामुळे या कुणाचे असे होतसे कधीचे हसे खरी ओढ पेशीतुनी या जिवाची नवे नाव नात्यास तो ठेवतो स्वत:च्या रुपाला जगी पाहतो तो नवे स्वप्न त्याचेच साकारतो फुटे अंकुराला कळी पालवी जी नवा वृक्ष होण्यास जोपासतो असे कौतुकाची अनोखी अदा ही स्वत:तील बापास जोपासतो सौ.अर्चना मुरूगकर

प्रदूषण

 *प्रदूषण टाळा अन्यथा विनाश अटळ* नमस्कार..  पर्यावरण म्हणजे जिवाच्या आजूबाजूचा परिसर! याचा जिवावर परिणाम होतो तसाच जिवाचाही पर्यावरणावर परिणाम होतो. अरण्यात राहणारा माणूस ते आजचा माणूस यात खूप फरक झाला आहे. तसाच पर्यावरणातही फरक झाला.  निसर्गाशी संलग्न असे जीवन जगणारा माणूस ते निसर्गाचा फक्त उपभोग घेणारा माणूस असा बदल प्रकर्षाने जाणवत आहे.  तापमान बदल, मातीची झीज, ग्रीन हाऊस इफेक्ट, हवा प्रदूषण, पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण, रासायनिक खतांचा वापर, हायब्रीड बियाणे, बायोटेक्नॉलॉजीचा फायद्यासाठी वापर ही सगळी पर्यावरण -हासाची उदाहरणे.  याचे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. निसर्गातील संपूर्ण सजीव, निर्जीव घटकांवर याचा परिणाम होत आहे.आपली निसर्गपुजकाची संस्कृती! निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कितीतरी सण आपण साजरे करतो. नदीला आई म्हणतो. देवी म्हणून पूजा करतो. पण हळूहळू ही प्रथा शिल्लक राहिली आणि त्यामागची पर्यावरण रक्षणाची भावना कमी झाली.  आजच्या आपल्या राष्ट्रपती मा. द्रौपदी मूर्मू यांनी आदिवासी समाजाची ओळख करून देताना 'आम्ही निसर्गात राहणारे आणि निसर्गाचे रक्षण ही करणार

स्त्री आणि स्वयंपाकघर

 *रविवार लेख उपक्रम* दि.२/४/२०२३ *अजूनही स्वयंपाक या प्रकारात स्त्रियांची मक्तेदारी आहे का?*       खरे तर हा प्रश्नच अवास्तव आहे. आज  स्त्रिया माझी ही मक्तेदारी आहे, कुणीही हस्तक्षेप करू नका असे सांगतच नाहिएत! ही फक्त स्त्रियांची जबाबदारी आहे का? हा प्रश्न योग्य वाटतो.असे अनेकांना वाटते. ज्यांच्या अंगवळणी घर पडले आहे त्या आई, आजी, सासू, नणंद, जाऊ इत्यादी सर्वांना.सून सोडून.  पुरुषांनाही ही जबाबदारी फक्त स्त्रियांची आहे असे वाटू शकते, जेव्हा आयते हातात घेण्याची सवय लागलेली, लावलेली असते.  खरे तर मुलांचे संगोपन, घरात सुरक्षित रहाणे यासोबतच हे आलेअसावे. युद्ध, शेतीतली कठीण कामे किंवा अध्ययन यापासून स्त्रिया दूर होत्या, नजीकच्या भूतकाळात.  खरे तर स्वयंपाक हे पण शास्त्रच आहे. तो पण आपल्या माणसांसाठी प्रेमाने रांधावा लागतो. त्यात येणारे अनेक बारकावे, घरातल्यांच्या आवडीनिवडी जपाव्या लागतात. यासाठी निवांत वेळ, सराव, कौशल्ये, सहजता असे टप्पे येत जातात.  राहिला प्रश्न स्त्री - पुरुष आणि स्वयंपाक असा!  आता मुलींचे जीवन मुलांइतकेच नोकरीसाठी, कामधंद्यासाठी स्पर्धात्मक बनले आहे. तीची जडणघडण फक्त उद्

गझलची ओळख आणि सुरेश भट

 गझल काय आहे हे माहीत नव्हते. पण  एकदा १७-१८ वर्षाची असताना वाचनाच्या सवयीमुळे मिर्झा गालिब यांचे चरित्र असणारे पुस्तक वाचण्यात आले होते.  या सुरेश भटांच्याच रचना आहेत, हे माहीत नसताना आशाजींनी गायलेली त्यांची अनेक गाणी खूप आवडायची. एकूणच पद्य लेखन करताना गझलेची फार लवकर ओळख झाली. गझल लेखन वाचन दोहोंचाही आनंद खूप वाटतो. मा. सुरेश भटांच्या गझलांची  गोडी अवीट आहे. ते या क्षेत्रातील अढळ स्थान आहे.  त्यांच्या जीवनावर आधारित पूर्वी केलेली एक रचना पुढे देत आहे.काही कमतरता असू शकतात. पण आदरभाव खरा आहे.  आपण या गझलपंढरीचे एक वारकरी, एक कण म्हणून भाग्यशाली आहोत ही भावनाही त्यांच्या प्रती जवळचे नाते दृढ करत असते.  या निमित्ताने मा. विजय जोशी सरांचे ही ऋण व्यक्त करते. 'जे जे ठावे आपणासी.. ' या उक्तीप्रमाणे ते गझल कार्यशाळा घेत असतात , मार्गदर्शन करतात आणि शिष्यही घडवतात.  एका विशाल सागराला काही ओळींमध्ये मांडण्याचा हा अल्पमती प्रयत्न. धन्यवाद!  मन दु:खात रंगले बहुधा सुख त्यालाच मानले बहुधा नशिबाशीच रोजचे लढणे क्षण शब्दात सांडले बहुधा जगण्यानेच मानता परके कवितेनेच जाणले बहुधा छळणारेच भोवती

*मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन*

इमेज
 *रविवार लेख उपक्रम* दि.१५/१/२०२३ *मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन* *मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन*      आपले सगळेच सण उत्सव हे निसर्ग, शेतीप्रधान जीवनपद्धती, मौसमी फळे -भाज्या यांच्याशी निगडीत आहेत. पौष महिन्यात रथसप्तमीपर्यंत  होणारी आदित्य राणूबाईची पूजा, दर रविवारी केली जायची. त्याच्या कथा ऐकल्या जात असत.  त्यातून मिळणारा संदेश उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.. हे कानात घुमत असते. या रविवारची,रथसप्तमी ची पूजा, रांगोळीने चंदनाच्या पाटावर सूर्य, रथ रेखाटणे अशी होत असे. यातून प्रिंट मिडिया खूप प्रगत नसताना भौगोलिक ज्ञान,जीवन यांची सांगड  संस्कृतीच्या माध्यमातून  पुढच्या पिढ्यांकडे गेली.  बिब्याची फुले, करडईचे फुले यांना महत्व असायचे. बिब्याची फुले वातहारक आहेत. प्रत्येक देवतांच्या आवडत्या फुलांमध्ये काही वैशिष्ट्ये दडली आहेत. पिवळे, तपकिरी असे हे करडई फूल सूर्याच्या तेजस्वी पणाचे द्योतक आहे.  भोगविडे,संक्रांत, कर आणि महिनाभर चालणारे हळदीकुंकू असे उत्सवी बायकांच्या गोटातले वातावरण  संक्रांती निमित्ताने चालू असायचे. भोगी

गझल रसग्रहण (निखारा)

 निखारा """"'""""" *शांतपणे मी अवघड जगणे जगत राहिलो* *सुखस्वप्नांच्या भासावरती झुलत राहिलो* आजचे जगणे अवघड आहे तरी मी ते तक्रार न करता जगत आहे. त्या दु:खात असूनही सुखाचे भास मला होत राहिले. येणाऱ्या सुखाच्या आशेवर मी जगत राहिलो.  *अवती भवती जमले सारे सगेसोयरे* *स्वार्थ साधून निघून गेले कुढत राहिलो* सगेसोयरे फायद्यासाठी जवळ आले होते. त्यांचे काम झाले की निघून गेले आणि मी मात्र त्यांच्या आठवणीने आणि असा संधीसाधू पणा पाहून मनातच पुन्हा पुन्हा दु:ख करीत राहिलो.  *किती उन्हाळे जाळत गेले माहित नाही* *धोकादायक वळणावरती वळत राहिलो* नेहमी येणाऱ्या वंचनांमुळे गझलकाराचे मन दु:खी आहे. संकटामुळे होरपळले आहे. तरीही धोका पत्करुन, आव्हाने स्विकारुन जीवनात पुढे जाणे चालू आहे.  *जिकडे तिकडे रानभुलीच्या वाटा होत्या* *कुठे निवारा सापडतो का बघत राहिलो* जो मार्ग चोखाळावा तो भूल घालणारा फसवा निघत आहे. यामुळे जिवाला कोणताच दिलासा आधार राहिलेला नाही.  अशाही स्थितीत जिद्द न सोडता निवारा, आपल्या हक्काची विसाव्या ची जागा माणूस शोधत असतो.  *किती लांबचा प्रवास झाला क

गझलगंध

इमेज
  🔹 *गझल* 🔹 सुगंधाच्या  तराजूने फुलांना तोलतो आता* *हवा ही बोलकी झाली हवेशी बोलतो आता फुलांचा आकार, रूप न पाहता तुलना करताना गझलकार सुगंध ही बाब लक्षात घेणार आहेत. जो आपोआपच हवे सोबत येतो. जो  अदृश्य आहे, जाणवणारा आहे. अर्क आहे, बेधुंद करणारा आहे त्याची खरी ओळख दाखविणारा आहे. एक हळूवार कल्पना आहे.  माणसाची कार्यकिर्ती अशीच असते. त्याची ओळख असते. ती किर्ती हवे प्रमाणे पसरणारी असते. ही जाणून घेण्याचे प्रयत्न गझलकार करत आहेत.  * हा एकदा जेव्हा दिला आधार शब्दांनी* *बघा आकाश ताऱ्यांचे कसे मी तोलतो आता* शब्द शक्ती, शब्द ताकद, शब्द आधार आहेत. त्यामुळे कोणत्याही मोठ्या पदा शिवाय खूप मोठा अभिव्यक्तीचा अधिकार प्राप्त झाला आहे.  आकाश हे व्यापक, विशाल आहे. तारे या जणू विविध कल्पना आहेत. शब्दांमुळे कवी लीलया असा  हा भार पेलत आहे.  * जयांना स्पर्शण्या भीती सदा वाटेल डोळ्यांना* *अशा अस्पृश्य अश्रूंची तिजोरी खोलतो आता* जी अनेक दडवलेली दु:खे आहेत, ती सहजतेने कवी काव्याच्या माध्यमातून व्यक्त करू शकतात.  एकाचा उल्लेख करणे देखील दु:खदायक आहे. पण या माध्यमातून कवी अनेक दु:खे सहजतेने मांडू शकतो. तिजोरी म